प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२१ (खरीप) साठी शासनाकडून निधी मंजूर. ....... राज्या तील शेतकऱ्यांच्या पिकांना होणाऱ्या विविध प्रक...
प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२१(खरीप) साठी शासनाकडून निधी मंजूर........
या नुकसानीच्या भरपाई साठी अनेक शेतकरी बांधवानी नुकसानीचे पाठपुरावे देखील केलेले आहेत. हे नुकसान भरपाई चे दावे निकाली काढण्यासाठी देखील विमा कंपनीला निधी असलेली गरज व विमा कंपनीची मागणी विचारात घेता सन २०२१ च्या खरीप पीक विमा योजनेसाठी निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शासन निर्णयानुसार पीक विमा कंपनीला राज्य शासनाचा हप्ता साठी 865,95,58,459 ईतकी रक्कम वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2021 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्याची रु. 865,95,58,459/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2020 रब्बी हंगाम 2020-21 पासून तीन वर्षाकरीता दि.29.06.2020 दि. 17.07.2020 च्या शासन निर्णयान्वे भारतीय
कृषी विमा
कंपनी, इफ्को टोकिओ जनरल इंनशुरनस कं. लि., रिलायंस जनरल इंनशुरनस कं . लि., भारती ॲक्सा जनरल इंनशुरनस कं . लि., बजाज अलायन्स इंशुरनस कंपनी लि. व एचडीएफसी इर्गो इंनशुरनस कं .लि या 6 विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची
समन्वयक कंपनी
आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम
2021 अंतर्गत
उपरोक्त 6 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत
मार्गदर्शक सुचनांमधील मुद्दा क्र. 13.1.11 नुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2021 ची विमा हप्त्याची राज्य
हिस्सा रक्कम विमा कंपन्यांना दि.31.03.2022 अखेर अदा करणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत