शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी : सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शासनाकडून ८० % अनुदान... सन- २०२१-२२ करीता २०० कोटी निधी मंजूर... रा...
शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी : सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शासनाकडून ८० % अनुदान...
सन- २०२१-२२ करीता २०० कोटी निधी मंजूर...
राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी
राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन आदेश दिनांक ०६
जानेवारी २०२२ जारी करण्यात आला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन pradhanmantri
krushi sinchan yojana योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचाकरिता
अनुदान देण्यात येते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ५५
टक्के व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ४५ टक्के अनुदान ५ हेक्टर कमाल
क्षेत्राकरिता देण्यात येते. योजनेकरिता केंद्र शासन ६० टक्के व राज्य शासन ४०
टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. राज्य शासनाने दिनांक १८ नोव्हेंबर
२०२१ रोजी राज्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना ( Mukhyamantri
Shashwat Krushi Sinchan Yojana ) मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म
सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प
भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व
इतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ४५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान
उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या पद्धतीने सूक्ष्म
सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण ७५ व ८० टक्के अनुदान मिळणार आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवाना फायदा होणार आहे.
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202201061718249401.pdf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत