"गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे " ही योजना राबविण्यास एक वर्षाची (सन 2021-22), दि. 01.04.20...
"गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे " ही योजना राबविण्यास एक वर्षाची (सन 2021-22), दि.01.04.2021 ते 31.03.2022पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
“गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे " योजनेंतर्गत
सन 2017-18 व सन 2018-19 मध्ये निवड केलेल्या शेतकरी गटांना सन 2021- 22 साठी रु. 37.50 कोटी निधी उपलब्ध करुन
देणेबाबत...
प्रस्तावना :-
सन, 2022 पर्यंत
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्र शासनाच्या दृष्ट्टीकोणास अनुसरुन पीक उत्पादन वाढविन्यासाठी निविष्ठा, प्रशिक्षण,
सिंचन,यांत्रिकीकरण,
काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन इत्यादी बाबी
महत्वाच्या ठरतात. राज्यातील शेतकऱ्यांची जमीनधारणा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात
भरीव वाढ होण्यासाठी सामुहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पध्दती व काटेकोर
नियोजनाची आवश्यकता ही बाब विचारात घेऊन “गट शेतीस
प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे” ही योजना राबविण्यास संदर्भादिन दि. 05.10.2018 रोजीच्या शासन
निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे
"गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या
गट शेतीस चालणा देणे" या योजनेस संदर्भाधीन दि.09.09.2019 रोजीच्या
शासन निर्णयान्वे दोन वर्षाची मुदतवाढ (सन 2020-21पर्यंत)देण्यात आली
होती. तथापि वित्त विभागाच्या दि.04.05.2020 रोजीच्या शासन निर्नायान्वे Covid-19 च्या पार्श्गभुमीवर निधीची उपलब्धता व
लॉकडाउन मुळे कामांसाठी झालेला विलंब लक्षात
घेता या गटांना प्रकल्प आराखड्याप्रमाणे कामे करणे शक्य होण्यासाठी संदर्भाधीन दि.24.12.2021रोजीच्या शासन
निर्णयान्वे "गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या
गट शेतीस चालना देणे " ही योजना राबविण्यास एक वर्षाची (सन 2021-22), दि.01.04.2021
ते 31.03.2022पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुषंगाने आता सांचालक(आत्मा)यांनी
संदर्भादिन दि. 28.12.2021 सदर योजने अंतर्गत उर्वरित कामांसाठी कामांच्या
प्रगतीप्रमाणे व प्रकल्प आराखड्याप्रमाणे सन 2021-22 साठी एकुण रक्कम
रु. 41.79 कोटी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे.
सन 2021-22 करिता “गट
शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना
देणे” या योजनेसाठी रु.75.00 कोटी इतका निधी अर्थसंक्ल्पित करण्यात
आला आहे. तथापि कोविड-19 पॅन्डॅमिक च्या पार्श्गभूमीवर,
संदर्भाधीन
दि.14.10.2021 रोजीच्या शासन निर्णयान्वे
वित्त विभागाने विहित केल्याप्रमाणे सदर योजनेकरिता एकूण अर्थसंक्ल्पित रु.75.00
कोटी
निधीच्या 50 टक्केच्या मर्यादेत म्हणजेच एकूण रु. 37.50
कोटी
निधी उपलब्ध होईल..
त्यास अनुसरुन गट शेतीस प्रोत्साहन व
सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे
या योजने अंतर्गत सन 2017-18 व 2018-19 मध्ये
निवडलेल्या गटांना मंजूर प्रकल्प आराखड्याप्रमाणे
अपूर्ण प्रकल्पांचे काम पूर्ण करण्याकरिता सन 2021-22 करिता रु. 37.50
कोटी
निधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
शासन निर्णय :-
१. गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या
गट शेतीस चालना देणे या योजने अंतर्गत सन 2017-18 व 2018-19
मध्ये
निवडलेल्या गटांना मंजूर प्रकल्प
आराखड्याप्रमाणे अपूर्ण प्रकल्पांचे काम पूर्ण
करण्याकरिता सन 2021-22 करिता रु. 37.50 कोटी (अक्षरि
रुपये सदतीस कोटी पन्नास लाख फक्त) एवढा निधी आयुक्त (कृषी) यांना वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202112301157303901.pdf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत